तुळजापुर तालुक्यातील शेतकऱ्यांना खरीप पीक विमा तातडीने वितरीत करण्याची मागणी

नवचैतन्य टाईम्स उस्मानाबाद जिल्हा प्रतिनिधी(आशा वाघ)-तुळजापूर तालुक्यात गतवर्षी अतिवृष्टीने झोडपून काढल्याने खरीप पीकांचे नुकसान झाले असून,पिक कापणी अहवाल तसेच आणेवारी ५० पैशाचा आत असल्याने उस्मानाबाद व तुळजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना खरीप पिक विमा तातडीने वितरित करण्याची मागणी देवराज मित्र मंडळाने केली आहे.तालुका कृषी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून तात्काळ पीक विमा वितरित करावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.निवेदनावर तालुका अध्यक्ष ॲड उदय भोसले यांची स्वाक्षरी आहे.

error: Content is protected !!